HW News Marathi
महाराष्ट्र

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात भाजप-शिवसेना पक्षांचे गोड कौतुक

पुणे | महाराष्ट्र राज्य मंडळाच्या वतीने यंदा दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावरुन वादाला तोंड फुटले आहे. दहावीच्या नवीन पुस्तकात यंदाच्या वर्षापासून ‘राज्यशास्त्र’ या विषयचा समावेश करण्यात आला आहे. पण, राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आले आहे. तर अप्रत्यक्षणे काँग्रेसवर आणि कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भाजप

पाठ्यपुस्तकातील उल्लेखावरुन वाद निर्माण होण्याची शक्तता आहे. कारण या पुस्तकात ‘भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे,’ अशी पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले.

शिवसेना

शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे. विशेष म्हणजे ही माहिती धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हास भगव्या रंगात छापण्यात आली आहे. तसेच भाजपने या पुस्तकाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का?”

News Desk

बेपत्ता नगररचनाकार करपेंच्या 39 बांधकाम परवान्यांची होणार चौकशी

News Desk

पाझर तलाव फुटल्याने 30 हेक्टरवरील पिकासह जमिनीही गेल्या खरडून

Aprna
महाराष्ट्र

छत्रपतींचे नाव असलेल्या योजनेतही शासनाचा घोटाळा

News Desk

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 14,388 कोटी कर्जाचे वाटप केले. परंतु 46.52 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याची माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआय ने उघडकीस आल्यामुळे सध्या एकूण कर्जवाटपावर प्रश्न उपस्थित होत आहे.

अनिल गलगली यांनी शासनाकडे राज्यातील कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची माहिती मागताना एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण वाटप निधी याची माहिती जिल्हानिहाय मागितली होती. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी अशी माहीती शासन स्तरावर उपलब्ध नसल्याचे गलगली यांना सांगितले.

वाटप केलेल्या निधीची शासनाकडे जिल्हा निहाय आणि गाव निहाय माहिती उपलब्ध नसणे ही यंत्रणेतील मोठी चूक आहे. ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत. त्यांचा प्रत्यक्षात सम्मान केला गेला की नाही याची शहानिशा करण्याचे मार्ग शासनाने स्वतः बंद केल्याची टीका करत अनिल गलगली यांनी जिल्हा निहाय आणि गाव निहाय जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना द्यावेत अशी मागणी केली आहे.

गलगलींना उपलब्ध झालेली ३६ जिल्ह्यांची माहीती खालीलप्रमाणे

  • योजने अंतर्गत दाखल अर्ज- 56,59,159
  • अहमदनगर – 3,34,920 दाखविण्यात आलेले अर्ज 14,797
  • मुंबई उपनगर- 1620
  • मुंबई शहर – 23715
  • राष्ट्रीयकृत बँकेत मंजूर खाते 19,88,234
  • राष्ट्रीयकृत बँकेत दिलेली रक्कम 77,66,55,13,440. 76
  • राष्ट्रीयकृत बँकेने वाटप केलेली रक्कम 75,89,98,20,857. 28
  • डीसीसी बँकेतील मंजूर खाते- 26,64,576
  • डीसीसीला दिलेली रक्कम 67,70,18,88,772. 36
  • बॅंकेने लाभार्थ्यांना वाटप केलेली रक्कम- 67,97,74,78,292.76

Related posts

नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी, राऊतांचा भाजपवर आरोप

News Desk

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

News Desk

मुंबई लोकल प्रवास करण्यासाठी केवळ दोन डोसच नव्हे,आणखी असेल ही अट!

News Desk