HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख शरद पवारांना म्हणतात …’काका मला वाचवा’!

मुंबई | गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. दिल्लीत काल (२१ मार्च) शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांना अभय दिल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. या व्यंगचित्रात घाबरलेले अनिल देशमुख आणि त्यांच्यापाठी शरद पवारांची सावली दाखवण्यात आली आहे. अनिल देशमुख हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक मारत असल्याचे दिसत आहे. हे व्यंगचित्र ट्विट करताना भाजपने एक कॅप्शनही लिहली आहे. पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे. भाजपच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीच्या दिशेने होता हे दिसून येत आहे.

 

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही- जयंत पाटील

राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र विधानसभेकरिता योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सभा

News Desk

राज्य सरकारलाच कोरोना झालाय, भाजपची बोचरी टीका!

News Desk

जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

News Desk