HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना सुटका मिळेपर्यंत भाजप काळ्या फीती लावून करणार सरकारचा निषेध – चंद्रकांत पाटील

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानतंर भाजप त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अर्णब गोस्वामी यांच्या पाठीशी ठाम आहेत. त्यांनी काळी फीत घालण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत अर्णब यांची सुटतां होत नाही तोपर्यंत ते आणि त्यांचे सहकारी काळी फीत घालणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

अर्णब गोस्वामी यांची सुटतां होईपर्यंत आपण सगळे काळ्या फीती लावून सरकारचा निषेध करणार आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारची अरेरावी चालली आहे, सरकार मिळालं म्हणजे स्वर्ग मिळाले असे वाटते, असा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१०वी, १२वी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

News Desk

साहेबांचं नेतृत्व हे लाटातून आलेलं नाही…विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फिरवलं ते पवारांच्या भाषणाने ! रोहित पवारांकडून आठवणींना उजाळा…

News Desk

आता मराठा समाजाच्या मुलांनी पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं? संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk