HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना सुटका मिळेपर्यंत भाजप काळ्या फीती लावून करणार सरकारचा निषेध – चंद्रकांत पाटील

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानतंर भाजप त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अर्णब गोस्वामी यांच्या पाठीशी ठाम आहेत. त्यांनी काळी फीत घालण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत अर्णब यांची सुटतां होत नाही तोपर्यंत ते आणि त्यांचे सहकारी काळी फीत घालणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

अर्णब गोस्वामी यांची सुटतां होईपर्यंत आपण सगळे काळ्या फीती लावून सरकारचा निषेध करणार आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारची अरेरावी चालली आहे, सरकार मिळालं म्हणजे स्वर्ग मिळाले असे वाटते, असा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीज कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांनी गमावले प्राण

swarit

मुंबई आणि पुणे दोन्ही शहरात ‘सन्मान मोर्चा’ला परवानगी नसताना सुद्धा मोर्चा काढला

News Desk

राजकीय समीकरण बदलताना दिसली की शरद पवार भूमिका घेतात – नाना पटोले

News Desk