HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून- अशोक चव्हाणांना विश्वास

मुंबई – सरकार विरोधात असलेला रोष नांदेडकरांनी व्यक्त करत भाजपला त्यांची जाग दाखवून दिली दिली आहे. असे मत प्रदेश कांग्रेसचे अध्यक्श अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. नांदेड पालिकेतील कांग्रेसचा विजय हा प्रचंड मोठा विजय असून भाजपचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाल्याचं हे द्योतक असल्याचंही त्यानी स्पष्ट केलं.

नांदेड महापालिकेच्या 81 पैकी आता पर्यंत 73 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्या पैकी 67 जागा कांग्रेसने जिंकल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. कांग्रेसला 71 जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या वेळ पेक्षा तब्बल 30 जागा कांग्रेसने अधिक जिंकल्या आहेत. कठीण काळात नांदेडकरांनी कांग्रेसला साथ दिल्या बद्दल चव्हाणांनी त्यांचे आभार मानले. भाजपच्या अमिषाला आणि खोट्या प्रचाराला नांदेडकर भूलले नाहीत असंही ते म्हणाले. भाजपने फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र ज्यांना त्यांनी फोडलं ते सर्व जण पराभूत झाल्याची माहीती त्यांनी दिली. जातीय ध्रुविकरण करण्याचाही प्रयत्न भाजपने केल्याचं चव्हाण म्हणाले. भाजपने नांदेड मध्ये पूर्ण जोर लावूनही त्यांच्या पदरात काहीच पडले नाही असंही त्यानी स्पष्ट केलं. या पुढच्या काळात कांग्रेस अजून जोमाने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यानी सांगितले तर राजीनामा देईन – अशोक चव्हाण

News Desk

आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- प्रविण दरेकर

News Desk

“..आता मी सीडी लावण्याचं काम करणार”, खडसेंचा भाजपला इशारा  

News Desk