HW News Marathi
महाराष्ट्र

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

मुंबई | राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक बंदीचा फटका आता गणेश कार्यशाळामध्ये बनत असलेल्या गणेश मूर्तींना बसत आहे. गणेश उत्सव अगदी काही दिवसावर येवून ठेपला आहे. याच कालावधीत शासनाने प्लास्टिक बंदी घातल्याने याचा परिणाम गणेश मूर्ती घडविणाऱ्या कार्यशाळावर झाला आहे. गणेश मूर्ती झाल्यावर पावसाने भिजू नये म्हणून व खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकने झाकली जाते. मात्र आता प्लास्टिक बंदी झाल्याने या गणेश मुर्त्या झाकायच्या कशा, ह्या विचारात गणेश मूर्तीकारांना पाडले आहेत.

शहरात शाडू मातीपासून मूर्ती बनविणाऱ्या अनेक कार्यशाळा आहेत. बाप्पाच्या काही मुर्त्या विदेशात देखील जात असल्याने या मूर्त्यांना प्लास्टीकचे आवरण घातले जाते. परिसरातील धूळ बसल्याने मुर्त्या खराब होत असल्याने प्लास्टिक घालून या मुर्त्यांचे रक्षण केले जाते. मात्र आता प्लास्टिक बंदी असल्याने कारवाई होण्याच्या भीतीने मुर्त्या न झाकता ठेवल्या असल्याने धुवाधार पावसात या मुर्त्यांवर परिणाम होत आहे. प्लास्टिकला अन्य पर्याय नसल्याने ह्या मुर्त्या जपण्यासाठी मूर्तीकारांना धडपड करावी लागत आहे. मुर्त्यांची बनावट नाजूक असल्याने या मुर्त्यांची पुन्हा सफाई करताना हानी पोहोचत आहे.

मूर्तीकारांना प्रथमच अशा वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी शाडू मातीच्या किचकट मूर्तीचा प्रसार करणाऱ्या मुर्तीकाराना आता समस्येने ग्रासले असल्याने प्लास्टिक ऐवजी अन्य पर्याय मूर्तिकार शोधत आहे.

गेल्या ५५ वर्षापासून मुर्ती घडविणाऱ्या मुर्तीकार पांडुरंग राजाराम कदम यांच्याशी प्लास्टिक बंदीवर संवाद साधताना ते म्हटले की, पालिकेने प्लास्टिक बंदी करणे हा सरकारचा एक उत्तम निर्णय आहे. या निर्णयाचा आम्ही देखील स्वागत करत आहोत. परंतु प्लास्टिक बंदीचा सर्वात जास्त त्रास हा शाडूच्या मुर्तींना होतो. शाडूच्या मुर्तींना कलर आणि धूळ चिकटून राहते. त्यापासून रक्षण करण्यासाठी आम्ही मुर्तीकार प्लास्टिकच्या आवरणाने बाप्पाच्या मुर्ती झाकून ठेवतो. मात्र प्लास्टिकचे आवरणात मुर्ती नाही झाकले तर या मुर्तींवर ब्रश मारला तर ब्रशबरोबर कलर देखील निघतो. त्यामुळे यंदा मुर्तीकारांना त्याच्या बाप्पाच्या मुर्ती घडविण्यापेक्षा त्यांचे पावसापासून कशी सुरक्षा करावी याच चिंता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व सातबारा मिळणार डिजिटल स्वाक्षरीने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

…तर उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला!

News Desk

12 आमदारांबाबत शब्द खर्च करणार नाही, शरद पवारांचा थेट राज्यपालांना इशारा!

News Desk