HW News Marathi
देश / विदेश

राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीप्रमाणे ऐकून घेतले | कंगना राणावत 

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशा वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून तापले आहे. त्यातच काहीच दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून कंगनाची वांद्र्यातील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. याच पार्श्वभूमीवर, आज (१३ सप्टेंबर) कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. यावेळी राज्यपाल आणि कंगना यांच्यात साधारणतः ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेत्री कंगना राणावतने दुपारी ४ च्या सुमारास राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली कि, “मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मी मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल त्यांना सांगितले. मला आशा आहे की, याप्रकरणी मला न्याय मिळेल. जेणेकरुन इतर तरुण मुलींसह सर्व नागरिकांच्या मनात प्रशासनाबद्दल अधिक विश्वास निर्माण होईल. हे माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे आपल्या स्वत:च्या मुलीप्रमाणे ऐकून घेतले”, अशी प्रतिक्रिया कंगनाने माध्यमांशी बोलताना दिली.

कंगनाने यापूर्वी आपल्या एका ट्विटमध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. “उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावत प्रकरणाची हाताळणी अयोग्य पद्धतीने केली”, असे राज्यपालांनी त्यावेळी म्हटले होते. त्यानंतर, आज कंगना हिने तिची बहीण रंगोली हिच्यासह राज्यपालांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | कोरोनामुळे युरोपमध्ये राजघराण्यातील पहिला मृत्यू

News Desk

जागतिक महिला दिना निमित्ताने मोदीना कुंवर बाई यांचे स्मरण

swarit

“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असतात?”, मुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk