HW News Marathi
महाराष्ट्र

ब्राह्मण समाजानेही केली आरक्षणाची मागणी

पुणे | मराठा आरक्षणानंतर आता इतर समाजाकडूनही आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. ब्राह्मण समाजाच्या स्थितीचे सर्वेक्षण करुन समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यामुळे गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही ब्राह्मण आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

ब्राह्मण समाजाला जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण द्यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. “ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करावे. ब्राह्मण समाज मागासलेला असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाल्यास शासनाने आरक्षण द्यावे,” असं आनंद दवे म्हणाले.

मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणाच्या विधेयकाला विधीमंडळात मंजुरी मिळाली असून राज्यपालांचीही त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर मुस्लीम आणि धनगर आरक्षणासह ब्राह्मण समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे.

दुसरीकडे, गुजरातमध्येही ब्राह्मण समाजाच्या आरक्षणासाठी मागणी होत आहे. गुजरातमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ९ टक्के आहे. त्यामुळे इथल्या ब्राह्मण समाजाने इतर मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेऊन ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

News Desk

बीडमध्ये राजकीय वातावरण तापले, शिवसंग्रामचे १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

News Desk

मराठवाड्यातील ७६ पैकी ४७ तालुक्यांना आर्थिक सवलती जाहीर

Gauri Tilekar
महाराष्ट्र

मराठा आंदोलकांसाठी दिवाकर रावतेंनी मोठी घोषणा

swarit

मुंबई – मराठा समाजाला नुकतेच 16 % आरक्षण मिळाले असून त्यासाठी अनेकांचे जीव गेले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. यामध्ये ४२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या लोकांच्या कुटुंबातील एका सदस्याला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आंदोलनात सहभागी होत जीवाचे बलिदान देणाऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाकडून वारंवार करण्यात येत होती. या मागणीचा विचार करुन भाजपा सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आरक्षणासाठी आपला जीव दिल्याबद्दल कुटुंबियांना १५ लाखांची मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. कुटुंबातील कर्ती व्यक्ती गेली असल्यास एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र आर्थिक मदतीबाबतचा निर्णय अद्याप देण्यात आला नसून कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

Related posts

भारताची वाटचाल सिरियाच्या दिशेने | प्रकाश आंबेडकर

News Desk

ट्रक व जीपचा भीषण अपघात; 6 प्रवासी जागीच ठार; अंबाजोगाईजवळील घटना

News Desk

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीयांचे एकमत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती!

News Desk