HW News Marathi
महाराष्ट्र

सिडकोच्या घरांसाठी बम्पर लॉटरी जाहीर

नवी मुंबई | नवी मुंबईतील सिडको घरांसाठी बम्पर लॉटरी जाहीर झाली आहे. सिडकोने यावेळी तब्बल १४ हजार ८३८ घरांची लॉटरी काढली. अत्यल्प आणि अल्प गटासाठी लॉटरी काढण्यात आले आहे. ही सर्व घरे सामान्या नागरिकांना अडीच लाख रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. सिडकोच्या घरांसाठी १३ ऑगस्टला (आज) पासून ते १५ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या भागात ज्यांच्या नावावर घरे आहेत, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.

सिडकोच्या घराचे क्षेत्रफळ

अत्यल्प आणि अल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १८ लाखांचे तर २५.८१ चौ.मी म्हणजे २७७ चौरस फूट ऐवढे क्षेत्रफळ आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) २६ लाखांच्या घराचा एरिया २९.८२ चौ. मी (३२० चौरस फूट) आहे. सिडकोची ज्यांना लॉटरी लागणार त्यांना २०१९ मध्ये ताबा देण्यात येणार आहे.

कोणत्या भागात किती घरे

  • अत्यल्प गटासाठी तळोजा – २८६२, खारघर – ६८४, कळंबोली – ३२४, घणसोली – ५२८, द्रोणागिरी – ८६४
  • अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा – ५२३२, खारघर – १२६०, कळंबोली – ५८२, घणसोली – ९५४, द्रोणागिरी – १५४८
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री म्हणतात…

News Desk

हसन मुश्रीफांचा दावा हास्यास्पद, लोकांची निव्वळ करमणूक !, चंद्रकांत पाटलांचा पलटवार 

News Desk

#MaharashtraBudget Live Updates : आमदार विकास निधी २ कोटीवरून ३ कोटीवर

swarit
देश / विदेश

सोमनाथ चॅटर्जी यांच्याविषयी थोडक्यात… 

News Desk

मुंबई | सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी झाला. चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते होते. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि १९७७ व १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९८९ , १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.

अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला. जुलै २००८ मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली.

 

 

 

Related posts

अमित शहांची संपत्ती ३०० टक्यांनी वाढली

News Desk

पंतप्रधान मोदींच्या हस्ते युपीमध्ये होणार १५०० कोटींच्या विकास योजनांचे उदघाटन!

News Desk

आधी महाराष्ट्राचा अपमान आता मोदींकडून शरद पवारांचं कौतुक

Manasi Devkar