HW News Marathi
देश / विदेश

“… परंतु ७५ वर्षात झालेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे”- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई | काही लोक म्हणत असतील ७५ वर्षात काहीच घडलं नाही. परंतु ७५ वर्षात केलेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे. त्याच दिशेने व आपल्या पूर्वजांनी जे काम केलेय त्याचपध्दतीने येत्या काळात काम करायचे असल्याचे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केले.सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदोत व हे स्वातंत्र्य असेच तेवत राहो अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करतानाच कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. दीड वर्षात सर्व कर्मचारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी आपत्तीवर मात करण्याचे काम केले. त्यातून परिस्थिती बदलली आहे.

पुढचा स्वातंत्र्य दिन यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल अशी अपेक्षा…

पुढचा स्वातंत्र्य दिन आपल्याला यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल अशी अपेक्षा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. या ७५ वर्षाच्या कॉंग्रेसच्या राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी काम केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आज उत्साहात साजरा करण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर मुंबई विभागीय कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर आदींसह पक्षाचे मुंबई व प्रदेशचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“स्फोटक प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे ?”, वकील असीम सरोदेंचा सवाल

News Desk

Republic Day | मुंबईत रंगणार नौका नयन स्पर्धा

News Desk

मी शिवरायांचा अपमान केला नाही, उलट…! व्यंकय्या नायडूंची पहिली प्रतिक्रिया

News Desk