HW News Marathi
Covid-19

‘देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला’, केंद्र सरकारची कबुली

नवी दिल्ली | कोरोना काळात ऑक्सिजन अभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आंध्र प्रदेशात ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय ने मंगळवारी संसदेत दिली. केंद्र सरकारद्वारे पहिल्यांदाच याची कबुली देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्राल्याने सांगितले की, ९ ऑगस्ट २०२१ रोजी आंध्र प्रदेश सरकारद्वारे केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे. जी संसदेद्वारे सभागृहात मांडण्यात येत आहे. १० मे २०२१ रोजी SVRR हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासणीत समोर आलं की, ऑक्सिजन टँक आणि बॅकअप सिस्टममध्ये झालेल्या बदलामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात प्रेशर कमी झाला. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यात अडचण आली.

देशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही

संसदेत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ऑक्सिजन अभावी लोकांचा जीव गेलेला नाही असं केंद्राने सांगितलं होतं. परंतु राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं होतं हे मान्य केले होते. मात्र कुठल्याही रुग्णाच्या मृत्यूसाठी हे कारण नव्हतं. केंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता. तर राज्य सरकारने जी माहिती दिली तीच केंद्र सरकारनं संसदेत सादर केली असा दावा भाजपाकडून करण्यात येत होता.

केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली होती. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उचलले होते. मोदी सरकारने राज्य सरकारांकडून खरे आकडे मागितले. राज्य सरकारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने किती रुग्णांचा मृत्यू झाला याची आकडेवारी मागितल्याचे सूत्रांनी सांगितलं होतं. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या मृत्यूंची आकडेवीरी पावसाळी अधिवेशनातच मांडली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं, अखेर ही आकडेवारी संसदेत मांडली गेली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाशक्ती असोसिएशन व एस एम एस ग्रुप तर्फे गरजूंना अन्नदान,मदत लॅाकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार !

News Desk

पुण्याच्या महापौरांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने केला सन्मान !

News Desk

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसींचा साठा कमी पडला नसता !

News Desk