HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल-उद्धव ठाकरे ,अजित पवार भेटीत नेमकं काय घडलं ? १२ आमदारांबद्दल राज्यपाल काय म्हणाले ?

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये आज(1 सप्टेंबर ) महत्वाची बैठक पार पडली. त्या 12 आमदारांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मात्र या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

काय चर्चा झाली?

राज्यपाल भागत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अजित पवार यांनी या भेटीबादल खुलासा केला आहे. राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांच्या सोबत पावसासंदर्भात बातचीत झाली आणि राज्यपालांना १२ आमदारांविषयी निर्णय घेण्याचा विनंती केली, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

सरकारचा निर्णय मान्य करणे अथवा नाकारणे

तसंच, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. राज्यापालांना आदेश देण्याचे न्यायालयाला घटनात्मक अधिकार नाहीत. मात्र ८ महिने आमदार नियुक्त्यांना लागला, राज्यपाल लवकरात लवकर आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. सरकारचा निर्णय मान्य करणे अथवा नाकारणे हा सर्वस्वी राज्यपालांचा अधिकार आहे, असं मतही न्यायालयाने व्यक्त केलं.राज्यपालांच्या भूमिकेवर न्यायालयाने सुद्धा नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोगस मतदानाची शक्यता ?

News Desk

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

News Desk

ट्विटरच्या माध्यमातून आव्हाडांनी पुन्हा एकदा डागली मोदी सरकारवर तोफ

swarit