HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीवरुन राज ठाकरेंनी केली सरकारची पाठराखण!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (५ एप्रिल) मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज (६ एप्रिल) राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारी लोकं जबाबदार असल्याचं सांगताना पश्चिम बंगाल वैगेरे इतर राज्यांमध्ये लाटा येत नसल्याची टीका त्यांनी केली. तसंच इतर राज्यांमध्ये रुग्ण मोजले नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

“काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,” असं सांगत राज ठाकरेंनी ठाकरे सरकारची पाठराखण केली.

“परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

“अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. राज्यात पेशंटची संख्या वाढत आहे. आधी पेक्षा ही लाट सर्वाधिक मोठी आहे. महाराष्ट्रातच कोरोनाची सर्वात मोठी लाट का आहे? असं मुख्यमंत्र्यांना मी विचारलं. परंतु याबाबतच्या खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येत असतात. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होतात, शेतकऱ्यांचे मोर्चेही सुरू आहे. तिथे कोरोनाची लाटबिट नाही. फक्त महाराष्ट्रातच आहे, असं राज म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला! – देवेंद्र फडणवीस

Aprna

‘उद्वव ठाकरेंना जे करायचयं ते करु दे, मला जे करायचयं ते मी करणार’, अटकेनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

News Desk

भाजप नव्हे मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल !

News Desk