HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे!’ पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

नवी दिल्ली | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते.

तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताच आता चंद्रकांत पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राजकारणात कुणाला मतं मिळतं, कुणाचं सरकार येतं यावर ठरत असतं. तुमचं सरकार काही लोकांनी मतं देऊन आलेलं नाही. तुम्ही गिमिक करून सत्तेत आला आहात. मोदी लोकांनी मत दिल्याने आले आहेत. तुम्ही मोदींवर बोलून काय होतंय, असा चिमटा त्यांनी काढला. वडेट्टीवार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपलं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मोदींनी देशाला पुढे नेलं की खड्ड्यात घातलं हे लोकं ठरवतील. मतपेट्यातून ते दिसतंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे

दिल्लीत सध्या भाजप नेत्यांच्या बैठक सुरु आहेत. यावर चंद्रकांत पाटलांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचं काम चालतं. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणं आणि खातं समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असं सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी केले वर्ल्ड इकोनॉमिक फोरम च्या निर्णयाचे स्वागत

News Desk

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील! – मुख्यमंत्री

Aprna

ST कर्मचाऱ्यांनी दगड-चप्पल फेक आंदोलन करणे, हे अतिशय दुर्दैव! -धनंजय मुंडे

Aprna