HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती – चंद्रकांत पाटील

मुंबई | लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे हे राज्य असून, हे राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे. लोक आता मतदानाची वाट बघत असून, भ्रमात न राहण्याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करत तुम्ही सत्तेत बसला आहे. येत्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यातील नामांकित व्यक्‍तींना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविण्यात येत आहे. देशद्रोहाचे काम करणाऱ्या पूर्ण संरक्षण देण्याचे कामही हे सरकार करत आहे. अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांनाही गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

अजिंक्‍यतारा किल्ल्याची खासदार उदयनराजेंसोबत पाहणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला होता. या वेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचा कार्यक्रम असताना यावेळी शिवेंद्रसिंहराजे अनुपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही” – छत्रपती संभाजीराजे 

News Desk

राज्य सरकारलाच कोरोना झालाय, भाजपची बोचरी टीका!

News Desk

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा | सर्वोच्च न्यायालय

News Desk