HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार? चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

पुणे | महाविकास आघाडीतील नेते विरुद्ध भाजप नेते असा राजकीय आरोपप्रत्यारोपांचा खेळ राज्यात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी चिमटा काढला आहे. याआधी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

“शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांचं शिक्षण यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले आहे. मात्र आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा ही आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले,”संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार?,” असा टोला त्यांनी लगावला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले,”त्या स्वप्नात आहेत का?,” अशी टीका पाटील यांनी केली.

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना पाटील म्हणाले, “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही,” असं पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk

“आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार”, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Aprna

पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी

News Desk