HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना-भाजप युतीत दुरावा निर्माण करण्यामागे षडयंत्र चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप!

मुंबई। राज्यात शिवेसना आणि भाजपमधील राजकारण चांगलच तापलं असून अनेक मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेना आमने सामने आली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन शिवसेना सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना -भाजपमध्ये योजनापुर्वक दुरावा निर्माण २०१९ मध्ये करण्यात आला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. युतीचे सरकार येऊ नये यासाठी षडयंत्र रचण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे भाजप-शिवसनेतील दुरावा अधिक वाढला आहे. खुर्चीच्या मोह असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे कळत नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरेंना ही गोष्ट कळत नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेनेतील दुरावा योजनापुर्वक करण्यत आला असल्याचा आरोप केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ मध्ये अतिशय योजनापुर्वक भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर निर्माण करण्यात आलं आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने हा दुरावा आणखी वाढवण्यात येत आहे. मात्र हे खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरेंना ही गोष्ट कळत नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं नुकसान होत आहे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळत नाही आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

स्वतःच्या पक्षाचे किती नुकसान झालं आहे…

मंदिरांचा विषय असाच आहे. मंदिर उघडणं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चालणार नाही. मग त्यांना चालणार नाही क? खुर्चीसाठी मी देखील उघडणार नाही. दुसरं काही कारणचं नाही मंदिर उघडण्याचे, हे खुर्चीवर प्रेम असणाऱ्या उद्धव ठाकरेंना कळत नाही. यामुळे उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे की, स्वतःच्या पक्षाचे किती नुकसान झालं आहे. मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त कोणीच शिवसेनेकडून बोलताना दिसत नाही आहे. आमचे परममित्र दिवाकर रावते कुठे गेले? अतिपरममित्र खूप दोस्ती आहे आमची असे रामदास कुठे गेले? अनिल देसाई, सुभाष देसाई, रवि वायकर कुठे गेले? कुठे गेलेत सगळेजण? फक्त संजय राऊत बोलत आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफवा पसरवू नका, राजकारण करू नका ! जयंत पाटील यांनी भाजपच्या संबित पात्रांना सुनावले

News Desk

निवडणुका होत असताना कोरोना सरकारला विचारून येत असतो का? फडणवीसांचा सवाल  

News Desk

१५ कोटी ७५ लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन भाजप आमदारासह १६ जणांवर गुन्हा दाखल

News Desk