HW News Marathi
महाराष्ट्र

“…म्हणून दादागिरी खपवून घेणार नाही”, प्रवीण दरेकरांचा इशारा!

मुंबई। सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात दंगल आणि दगडफेक यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय, विशेषता याचे पडसाद नांदेड, अमरावती आणि मालेगावात पाहायला मिळतात. आता दुसरीकडे भाजप नेते प्रविण दरेकर यांनी अमरावतीतील हिंसाचारावरून संताप व्यक्त केला आहे. त्रिपुरात घटना घडते म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करणार असाल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिलाय. तसेच यावर महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केलीय. कारवाई न झाल्यास हे प्रकरण हाताबाहेर जाईल, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केल आहे.

अन्यथा हे प्रकरण हाताबाहेर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, “त्रिपुरात घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचा उद्रेक होता कामा नये. तुम्ही इथली शांतता भंग करणार असाल, तर महाराष्ट्र सरकारने त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार असेल तर ते महाराष्ट्राच्या हिताचं राहणार नाही. मग अशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते म्हणून इथं दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्रात चालणार नाही. खपवून घेणार नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा हे प्रकरण हाताबाहेर जाईल.”

व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न

त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवांचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात तीव्र पडसाद मुस्लिम धर्मीयांमध्ये उमटत आहेत. या विरोधात रजा अकादमी आक्रमक झाली असून भिवंडीत रजा अकादमीचे अध्यक्ष शकील रजा यांनी भिवंडी बंदचे आवाहन केल्याने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यां मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.

अमरावतीत भीतीच वातावरण

त्रिपुरातील घटनेच्या काल मुस्लिम समुदायांनी अमरावतीत आंदोलन केलं होतं. मुस्लिमांनी दगडफेक केल्याने अमरावतीत भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध म्हणून आज अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, राजकमल चौक आणि गांधी चौकात अचानक शकेडो तरुण जमले. तोंडाला रुमाल आणि हातात काठ्या घेऊन आलेल्या या तरुणांनी संपूर्ण परिसरात जोरदार दगडफेक केली. या जमावाने दुकानांचीही तोडफोड करत जबरदस्तीने दुकाने बंद केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळे भडकल्या म्हणाल्या….

News Desk

शिवसेनेबाबत नितेश राणेंचं अत्यंत मोठं वक्तव्य, विनायक राऊतांनी जाहीर कार्यक्रमात थोपटली पाठ

News Desk

इच्छुकांना पक्षात परत घेण्यात कोणतीही अडचण नाही, अनेकजण संपर्कात !

News Desk