HW News Marathi
देश / विदेश

बँका आणि रेल्वेनंतर आता राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणासाठी सरकार १ लाख कोटी उभारणार

नवी दिल्ली | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येत्या ५ वर्षांत महामार्गांचं खासगीकरण करून एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच उद्योगांना या बाबतीत पुढे येऊन गुंतवणूक करून त्याचा फायदा घेण्यास सांगितले आहे.

बाजारपेठेतून १ लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना

राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि हा निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. सीआयआयच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. एनएचएआय पुढील पाच वर्षांत टोल वसुली आणि राष्ट्रीय महामार्गांच्या हस्तांतरणाद्वारे बाजारपेठेतून एक लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहे.

महामार्ग भाड्याने देण्यात येणार

नितीन गडकरी मंत्री म्हणाले की, बाजारात मालमत्ता विक्री किंवा लीज ही उद्योगांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. तसेच दुसरीकडे सरकारला पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य काढण्यास मदत मिळणार आहे. ते उद्योग तसेच सरकारसाठी फायदेशीर आहे, असे ते म्हणाले. यामुळे देशातील पायाभूत सुविधांना चालना मिळण्यास मदत होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#JammuAndKashmir : लोकसभा आणि राज्यसभेत अमित शहांचे निवेदन

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हिंदुस्थानी घटनेला तरी हुंदका फुटू द्या! – सामना

News Desk