HW News Marathi
महाराष्ट्र

…तर बाळासाहेब ठाकरे वरून राऊतांच्या एक थोबाडीत मारतील!

मुंबई | केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याचं पुण्याईवर चालला आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ‘संजय राऊत यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला पाहिजे. त्यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारावा. मग बाळासाहेब ठाकरेही वरुन संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील,’ अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

‘सरकारने राहुल गांधी यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले पाहिजे. कोरोनामध्येच सरकारची दोन वर्षे तर निघून गेली. देशासाठी अजून बरच काही करणे बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच्या पुण्याईवर देश चालत आहे. नवीन काही झालेले नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,’ असं संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढणार नाही! – संभाजीराजे

Aprna

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने

News Desk

बीडीडी पूनर्विकासाला स्थानिकांचा विरोध

News Desk