HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या कानाखाली आवाज काढू, प्रसाद लाडांचा इशारा

मुंबई | मराठा आरक्षणासाठी एकीकडे खासदार संभाजीराजे सामंजस्याने परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे भाजपचे इतर नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशा प्रसंगी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पक्ष समाजामागे ताकदीने उभा राहील.

वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर करू, खळ खट्याक करावे लागले तर ते देखील करू, सरकारचे कान बहिरे झाले असतील तर कानाखाली आवाज काढायचीही पक्षाची तयारी आहे, अशी आक्रमक भूमिका पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर भाजपने आता या प्रश्नावर मराठा समाजच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व भागांमध्ये दौरे करून मराठा समाजातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या जात आहेत. यातून समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका त्यांना समजावून सांगण्यासाठी अकरा सदस्यांची समिती नेमली आहे.

मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार कालबद्ध कार्यक्रम आखत नाही, तोपर्यंत मराठा समाजाच्या मागे पक्ष ताकदीने उभा राहील. मराठा आरक्षणासाठी पक्षातर्फे वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर ते ही करू, खळ खट्याक करावे लागले तर तेही करण्याची पक्षाची तयारी आहे. राज्य सरकारचे डोळे उघडणार नसतील व कान बहिरे झाले असतील तर कानाखाली आवाज काढून आवाज दाखविण्याचीही भाजपची तयारी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे….,” चंद्रकांत पाटलांची खंत

News Desk

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू

News Desk

“गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव?”, चित्रा वाघांचा सरकारला सवाल

News Desk