HW News Marathi
महाराष्ट्र

पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार !

मुंबई | पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहिन, असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केले आहे. अडीच-अडीच वर्षाचा शब्द कधीच दिला नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी दिले. वाटाघाडीत अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा शब्द नव्हता. भजापच्या नेतृत्त्वात सरकार स्थपान होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी या अनौपचारिक गप्पांमध्ये केला आहे. कोणती खाते कोणाला द्याचे अद्याप ठरले नाही.

सामनाच्या टीकेचा फरक पडतो आणि पडतही नाही, असे ही मुख्यमंत्री म्हणाले. भाजपला १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी गप्पांमध्ये सांगितले. सामनात भाजप आणि मित्र पक्षांवर टीका केली जाते. इतक्या ताकदीने सामनामधून काँग्रेस-राष्ट्रवादीवर लिहा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई दौरा रद्द झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.

आम्ही सत्तेचे भुकेलो नाही | संजय राऊत

“उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की, शिवसेनेकडे दुसरे पर्याय आहेत. मात्र ते पर्याय स्वीकारण्याचे पाप आम्ही करणार नाही. शिवसेना राजकारणात नेहमीच सत्याला महत्त्व देते. आम्ही सत्तेचे भुकेलो नाही, ” युतीसंदर्भात ज्वलंत प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआयला दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर का? प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकास फक्त शरद पवारांच्या होम पिचवर होतोय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर!

News Desk

…म्हणून नारायण राणेंनी भाजपमध्ये पळ काढला, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk

शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk