HW News Marathi
महाराष्ट्र

विकास फक्त शरद पवारांच्या होम पिचवर होतोय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर!

पुणे | ‘पुणे जिल्ह्यात विकास फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावात होत आहे’, असे म्हणत राष्ट्रवादीच्या आमदारांने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीचे खेडचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते काही दिवसांपासून थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शरद पवारांच्या होम पिचवर ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते यांनी सूचक इशाराही दिला आहे.

मोहिते सध्या आपल्याच नेत्यांच्या आणि सरकारच्या विरोधात बोलत आहेत. भामा आसखेड धरणाच्या पाण्याबाबत ते आक्रमक झाले आहे. भीमाशंकर परिसर देवस्थान विकास यावरून ते दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करत आहे. जिल्ह्यातील फक्त २ तालुक्यातच विकास होत आहे असेही त्यांचे मत आहे. विशेष म्हणजे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तीन पक्षांचे एकत्र सरकार स्थापन झाल्यामुळे एकाच वेळी खातेवाटप करण्यात आले होते. त्यामुळे अनेक इच्छुक हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाले होते. खेड तालुक्याला मंत्रिपद कधीच मिळाले नाही. त्यामुळे दिलीप मोहिते नाराज झाले असल्याचे म्हटले जात आहे.

‘विकास फक्त अजित पवार यांच्या बारामतीत आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातच घडत आहे, असं म्हणून त्यांनी पक्षाच्या नेत्यांवरच टीका केली आहे. याआधीही दिलीप मोहिते यांनी सोशल मीडिया आणि विविध वृत्तपत्रात त्यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी डॅमेज करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिलीप मोहिते यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काय कारवाई करते हे पाहण्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणी

News Desk

आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही – शरद पवार 

News Desk

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त आहे ? | जयंतराव पाटील

swarit