HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून सर्व आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण

नागपूर | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर सत्तानाट्य सुरू होते. यानंर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन वेगळी विचारसरणीचे एकत्र येऊन महाविकसाआघाडी असे नवे आणि ऐतिहासिक सत्ता समीकरण आले आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून अधिवेशनात वीर सावरकर आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर तहकूब करण्यात आली आहे. आज (१८ डिसेंबर) अधिवेशनाचे कामकाज सुरळीत सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सर्व आमदारांना त्यांच्या शासकीय निवसस्थानी जावून स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिले आणि त्यांनी देखील त्यांचा स्वीकार केला आहे. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात महाविकासआघाडी सर्व दिग्गज नेत्यांसोबत विरोधी पक्ष नेत मंडळी देखील उपस्थित असणार आहे.

सामनाच्या अग्रलेखावरून सभागृहात गोंधळ

एकत्र सत्तेत असताना शिवसेनेचा अग्रलेख असलेल्या सामानात लिहिलेल्या जुन्या मुद्द्यांवरून भाजपने शिवसेनेवर तोफ डागली आहे. भाजपसोबत सत्तेमध्ये असताना सामनातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली होती. त्यावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहातच ही टीका वाचून दाखवली. त्यामुळे एक खळबळ उडाली. त्यामुळे या राजकीय स्नेहभोजनात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी माणूस मेला तरी सवतीच्या पोराला सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे, सामनातून हल्लाबोल

News Desk

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका – चित्रा वाघ

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस यशाची असंख्य शिखरे गाठेल व्यक्त केला असा विश्वास…

News Desk