HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१३ एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. गेले अनेक दिवस राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता ही साखळी तोडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी संवाद साधण्याच्या सुरुवातीला लोकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर २०२१ या वर्षात जानेवारी, फेब्रुवारीच्या काळात रुग्ण कमी होते असेही ते म्हणाले. मात्र, राज्यात आज पुन्हा ६० हजारांचा टप्पा पार केल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून (१४ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे.

मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

– १४ एप्रिलपाससून १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू

– सकाळी ७ ते रात्री ८ या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार.

– सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहणार.

– नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.

– सार्वजनिक वाहतूक करण्यासाठी पत्रकारांना मूभा.

– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद.

– पावसाळी पुर्व कामे सुरु राहणार.

– बॅंका, ई-कॉमर्स सुरु राहणार.

– पेट्रोल पंप, कार्गो सेवा सुरु राहणार.

– हॉटेल, रेस्टोरंट यांना होम डिलेव्हरीची परवानगी.

– रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विकणारे सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत होम डिलेव्हरी करु शकणार.

– हॉटेल, रेस्टोरंटमध्ये बसण्यास परवानगी नाही.

– बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्यास परवानगी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार: किरीट सोमय्यांच विधान

News Desk

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! ‘आरटीआय’चे पत्र ट्विट करत भाजपचा गौप्यस्फोट

News Desk

रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल- मनसेचा इशारा

News Desk