HW News Marathi
महाराष्ट्र

“ही वेळ राजकारणाची नाही”, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१३ एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. गेले अनेक दिवस राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता ही साखळी तोडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी संवाद साधण्याच्या सुरुवातीला लोकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर २०२१ या वर्षात जानेवारी, फेब्रुवारीच्या काळात रुग्ण कमी होते असेही ते म्हणाले. मात्र, राज्यात आज पुन्हा ६० हजारांचा टप्पा पार केल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. देशात, राज्यात कोरोनाच्या लाटेला सुरुवात झाली असून स्थिती चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

– जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

– लसीकरण वाढवणे गरजेचे.

– लस दिल्यानंतर काही काळ प्रतिकारकशक्ती वाढायला वेळ लागतो.

– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था तोकडी पडताना दिसत आहे.

– हवाई मार्गाने लस आणण्याची परवानगी हवी.

– उपचार करण्यासाठी डॉक्टरांची गरज.

– विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून एकसाथ येत लढायला हवं

– आताची लाट भयंकर मोठी. मात्र, लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल. स्थिती आधीपेक्षा खूप भयंकर.

– आपण यापूर्वी कोरोनावर नियंत्रण मिळवून दाखवले आहे. आताचे संकट खूप मोठे. आरोग्ययंत्रणा तोकडी पडत आहे. मात्र, म्हणून आपण स्वस्त बसलेलो नाही.

– आरोग्य सुविधा वाढवत आहोत. मात्र, डॉक्टर्स हवे आहेत. निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी लढायला पुढे यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गजानन काळेंच्या पत्नी थेट कृष्णकुंजवर!

News Desk

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, १४ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा

News Desk

अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक सुरु, फडणवीसांचा दावा

News Desk