HW News Marathi
Covid-19

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

मुंबई । “सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितल्याचे समजते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बुधवारी (२६ मे) वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवरून ठाकरे सरकारमधील वाद उफाळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कारणामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ असल्याचेही सांगितले जात होते.

गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेले वाद चव्हाट्यावर आले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे उद्धव ठाकरेंनी पवारांना सांगितल्याचे वृत्त आहे.

या विषयांवरही चर्चा

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीतील विषय अधिकृतरित्या गुलदस्त्यात असले तरी सुरू असलेल्या चर्चांनुसार, या बैठकीत मराठा आरक्षण, राज्यातील कोरोनस्थिती, केंद्राकडून मिळणारी मदत, लॉकडाऊन, आर्थिक संकट यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक

News Desk

आवाजावरून कोरोना चाचणी करणे आता होणार शक्य !

News Desk

किरीट सोमय्यांनी कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटनांची चौकशीसाठी आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk