HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री एक नंबर काम करत आहेत – अस्लम शेख

मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळात राजकारण काही थांबले नाही. आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच. विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी काहीही वक्तव्य करत आहेत, असे मत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मांडले आहे.

प्रत्येक दिवशी कोणत्या तरी नेत्याला समोर करुन बदनामीचे काम केले जात आहे. उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

देशातील आणि राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता , ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे महाराष्ट्राला सांभाळत आहेत. त्याचे केंद्राने कौतुक केले आहे. राज्य सरकारने कोरोणनाच्या कठीण काळात देखील मुंबईमध्ये चांगले काम केले आहे. भाजपला हे समजत नाही. अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार फोल ठरतेय, असे म्हणत भाजपकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे, आणि टीकास्त्र सुरूच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकही लॉकडाऊन ! उद्यापासून १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

News Desk

कोरोनातून बरे झालेल्यांना आता TB संक्रमणाचा धोका..!

News Desk

बीडच्या केजमधील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आज औरंगाबादेत मृत्यू

News Desk