HW News Marathi
महाराष्ट्र

मोदी सरकारविरुध्द काँग्रेसचा अतिविराट मोर्चा

नांदेड | फ्रेंच कंपनीकडून राफेल नावाचे भारतीय सेना दलासाठी विकत घेण्यात येणार्‍या विमानाच्या खरेदीमध्ये मोदी सरकारने तब्बल 41 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराविरुध्द काँग्रेसने देशभर आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या अतिविराट मोर्चाला काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आयटीआयपासून निघालेल्या या मोर्चात जिल्हाधिकार्‍या कार्यालयापर्यंत काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेवरुन जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने दि. २५ रोजी राफेल खरेदीच्या भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी आ. संपतकुमार, आशिष दुआ,पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी पालकमंत्री आ. डी. पी. सावंत,काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर,आ.वसंतराव चव्हाण यांनी केले.

सकाळी नांदेड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परंतु या पावसाचा परिणाम मोर्चावर मात्र कुठेच दिसून आला नाही. सकाळी 9 पासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांचे जत्थे आयटीआय परिसराकडे येऊ लागले. 11 सुमारास महात्मा फुले पुतळा परिसरात 20 हजारांपेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित आले होते. या ठिकाणी पक्षाच्यावतीने जाहीर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नरेंद्र मोदी सरकारने राफेल खरेदीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफास करण्यात आला. यावेळी आ.संपतकुमार,आ.जोगेंद्र कवाडे, आ.डी.पी .सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण,लियाकत अली अन्सारी यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर चौफेर हल्ला केला. सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले. यानंतर या मोर्चास आयटीआयपासून सुरुवात झाली. पहिले टोक आयटीआय येथे तर मोर्चाचे शेवटचे टोक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होते. यावरुन मोर्चाची भव्यता सहज लक्षात आली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेलारांच्या ‘त्या’ व्यक्तव्यामुळे पेडणेकरांनी केली गृहमंत्र्यांकडे तक्रार

News Desk

संचारबंदीची ऐशीतैशी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या संपर्क कार्यालयावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

News Desk

जनतेची लूट, विकासकामात तूट, जाहिरातबाजी आणि उधळपट्टीला सूट! अशोक चव्हाण

News Desk
महाराष्ट्र

जंजिरा किल्ल्यावर 365 दिवस तिरंगा फडकणार ?

News Desk

मुंबई | जंजिरा किल्ल्यावर आतापर्यंत केवळ 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी आणि 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकावण्यात येत होता. मात्र सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता 365 दिवस कायम तिरंगा ध्वज फडकवण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे. यासंदर्भात सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद पोखरकर यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत केंद्र शासनाने हे आदेश दिले आहेत.

तिरंग्याचा मान राखत तो फडकवण्यात यावा, असे आदेश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. लवकरच या संदर्भातील तारीखही जाहीर केली जाणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र शासनाने हे आदेश दिल्याची माहिती संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे. याआधी 100 हून अधिक किल्ल्यांवर एकाच दिवशी भगवा ध्वज फडकावण्याची किमया सह्याद्री प्रतिष्ठानने केली होती.

Related posts

“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”

News Desk

#Vidhansabha2019 : येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू | मुख्यमंत्री

News Desk

मे २०२० पर्यंत राज्य प्लास्टिकमुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न यशस्वी होणार का?

swarit