HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत – भाई जगताप 

मुंबई | आगामी काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशात सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. माझी मुंबई, माझी काँग्रेस असा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे.

“माझी मुंबई, माझी काँग्रेस’‌ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ,” अशी प्रतिक्रिया मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकासआघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकासआघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे २२७ जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्या दिवशी सांगितला होता. काल पदभार स्विकारला तेव्हा पुनउल्लेख केला,” असेही ते म्हणाले.

काँग्रेसकडून नुकतंच भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. एकीकडे शिवसेनेकडून अनेक नेते पुढील सर्व निवडणुका एकत्र लढण्याची भाषा करत आहे. मात्र दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या या मताशी असहमत असल्याचं चित्र आहे. यामुळे महाविकासआघाडीतील तिन्ही घटक पक्ष येत्या महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रित की स्वबळावर लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – अजित पवार

News Desk

बिहारमध्ये निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर… संजय राऊत यांचा टोला

News Desk

राम कदम अर्णब गोस्वामी यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार

News Desk