HW News Marathi
Covid-19

कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा ! नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । राज्यात तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. “गरज पडली तर कर्ज घ्या. पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा”, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नाना पटोले यांनी आज (२३ मे) रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “तौक्ते चक्रीवादळादरम्यान कोकणाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. येथील नुकसानग्रस्तांना पुन्हा उभे करणे आवश्यक आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही दिली तरीही राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. कोकणवासियांना मदत करावी. गरज पडली तर कर्ज घ्यावे. पण कोकणातील नुकसानग्रस्त लोकांना भरीव मदत करावी”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच तिजोरी पाहून मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतील, असेही नाना पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे पंतप्रधान मोदींवर टीका करताना नाना पटोले म्हणाले की, “नैसर्गिक आपत्तीत केंद्राची मदत मिळणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा ४० टक्के हिस्सा जातो हे लक्षात असू द्या. त्यामुळे जर गुजरातला १ हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपये मिळावेत अशी अपेक्षा होती. पण, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला कोणतीच मदत केली नाही. हे पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत काय?” असा खोचक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंतादायक! मुंबईत आज तब्बल ३ हजार ६७१ नवे कोरोना रुग्ण

Aprna

महाराष्ट्रात तब्बल ७५ दिवसांनंतर एका दिवसात ५ हजारांवर नवे ‘कोरोना’ बाधित

News Desk

पंतप्रधान मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत २७ एप्रिलला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

News Desk