HW News Marathi
महाराष्ट्र

यास्मिन वानखेडेंचा नवाब मलिकांवर गंभीर आरोप,”ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक आरोप करतात”

मुंबई | सध्या सर्वाधीक गाजणारं प्रकरण म्हणजे आर्यन खान ड्रग्स प्रकरण. क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणाचा तपास करणारे अमलीपदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता वानखेडे यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण यास्मीन वानखेडे आता पुढे आल्या आहेत. मीडिया समोर येऊन पब्लिसिटी स्टंट करू नका, असे थेट आवाहन यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांना केले आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. आपला वेळ वाया घालवू नका. आम्ही तुम्हाला कोर्टात उत्तर देऊ, अशा शब्दात यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांना आव्हानच दिले आहे.

मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार

त्यांना अशा प्रकारे आरोप करणे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही कोर्टात जा. प्रसारमाध्यमांना बोलावून केवळ प्रसिद्धी मिळवू नका आणि तुमचा वेळही वाया घालवू नका. यास्मिन वानखेडे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. मलिकांच्या आरोपांबाबत बोलताना यास्मिन म्हणाल्या की, नवाब मलिक हे आदरणीय मंत्री आहेत. पण ही लॉबी त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असेल. ड्रग्ज लॉबींने त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे, तसेच त्यांच्या जवायाला अटक करण्यात आली होती. त्यामुळेच ते अशा प्रकारचे आरोप करत असावेत, असे यास्मिन म्हणाल्या. यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांना उत्तर देताना मलिक यांच्यावर गंभीर आरोपही केला. ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच मलिक आरोप करत आहेत, असे त्या म्हणाल्या. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान!

News Desk

‘त्या’ प्रक्षोभक भाषण प्रकरणी मंगल प्रभात लोढा यांना आयोगाकडून नोटीस

News Desk

सुशांतच्या प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल – संजय राऊत

News Desk