HW News Marathi
महाराष्ट्र

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अहमदनगर |राज्यात मनसुख हिरेन यांचा संशयित मृत्यू आणि त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचाच हात असल्याच्या शक्यतेने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची उचलबांगडी होणार असल्याचं म्हटलं जात असताना आता कॉंग्रेसची यावर प्रतिक्रिया आली आहे.

‘महाराष्ट्रातील पोलीस विभाग चांगलं काम करत आहे. मात्र कुठे जर चुकीचं होत असेल तर कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री अनिल देशमुख योग्य पद्धतीने काम करत असून त्यांचे मंत्रिपद जाईल असं मला वाटत नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातृ यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी घेतलेले पक्ष संघटनेविषयीचे निर्णय नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रद्द करतील, अशी चर्चा सुरू असतानाच थोरात यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. कोणतेही निर्णय घेताना आमच्यात समन्वय आहे. पक्षात कोणताही वाद नसून सोशल मीडियातून वाद असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. मात्र असं काही असेल तर आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू,’ असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा’-आदित्य ठाकरे

News Desk

‘त्या’ तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही, शरद पवारांचं भाष्य!

News Desk

शहरालगतच्या गावांचा पाणीपुरवठा तातडीने सुरु करा! – सुनिल केदार

Aprna