HW News Marathi
महाराष्ट्र

भावाला मंत्री केलं नाही म्हणून राऊत बिथरले । विनोद तावडे

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं विधान राऊतांनी केलंय. तरी, या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीतील सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही कायम सावरकर विरोधी राहिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेते काय भूमिका सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप नेते विनोद तावडे यांनी संजय राऊत हे भावाला मंत्री केलं नाही म्हणून बिथरले आहेत असं वाटतं. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसच्या सेवा दलने पुस्तक छापलं त्यावर मात्र एवढी जोरात प्रतिक्रिया दिलेली नाही. जर संजय राऊत यांनी सावरकर विरोधात वक्तव्य करणाऱ्या लोकांना खरंच अंदमानला पाठवायचे असेल तर राहुल गांधी यांना सर्वात पहिला नंबर लागतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. संजय राऊत यांचं वक्तव्य बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना मान्य आहे का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राऊत हे साधारण शरद पवार जे सांगतील तेच बोलत असल्याचा आरोपही तावडे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा मुंबईचा दूध आणि भाजीपाला रोखणार- खा. शेट्टींचा इशारा

News Desk

‘ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का?’ चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्याना कटू सवाल

News Desk

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, पंकजांचं सूचक वक्तव्य

News Desk