HW News Marathi
महाराष्ट्र

“मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय” – रामदास आठवले

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं राजकारण हे एनसिबी ड्रग्स, या प्रकरणामुळे चांगलच तापलं आहे. तर झालं असं, क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर सत्ताधाऱ्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून वानखेडेंची पोलखोल केली जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही रामदास आठवले यांनी केला.रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते. वानखेडे हे एक मागासवर्गीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोपच आता रामदास आठवले यांनी केला आहे.

राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचं

प्रभाकर साईल या केपी गोसावीच्या बॉडीगार्डचीही चौकशी झाली पाहिजे. प्रभाकर साईल यांच्यावर जर राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे, अशी मागणीही त्यांनी केली. आर्यनला पकडू नये यासाठी डिलिंग होऊ शकते, पण आर्यनला पकडल्यानंतर ही सगळी डिलिंग कशी होते? सवालही त्यांनी केला. शाहरुख खान यांना पैसे द्यायचेत असतील तर जेव्हा आर्यनला पकडलं तेव्हाच ही प्रोसेज झाली असती. पण आता एनसीबीने या प्रकरणात चार्जेस लावलेले आहेत आणि कोर्टात केस स्टँड झालेली आहे. आता या प्रकरणाची डिलिंग चौकशी होऊ शकते?, असा सवालही त्यांनी केला.

केंद्र सरकारवर आगपाखड करण्याचं काम मलिक करता

नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच काम घालण्याची भाषा करत आहे हे चुकीचं आहे. मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थांच्या संदर्भात अटक झालेली आहे. त्याचमुळे अशी वक्तव्य मलिक करत आहेत. नुसती केंद्र सरकारवर आगपाखड करण्याचं काम मलिक करत आहेत. पण वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत, असं सांगतानाच वानखेडे यांचं जर काही चुकत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

ड्रग्ज प्रकरणात खोट्या माहितीच्या आधारे मला गोवण्याचा कट

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात काल दुपारपासून महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काल दुपारी याप्रकरणात पंच म्हणून असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज प्रकरणातील खळबळजनक खुलासे केले. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे केल्याचा दावा प्रभाकर साईलने या व्हिडिओतून केला. पण आर्यनच्या सुटकेची डील १८ कोटी रुपयांची झाली. यामधील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंचे आणि उरलेले पैसे इतरांमध्ये वाटून घ्यायचे, असे गोसावीचे झालेले संभाषण प्रभाकरने ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे समीर वानखेडे या आरोपांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. काही तासांनंतर एनसीबीने एक पत्रक जारी करून प्रभाकरने लावले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात वानखेडे म्हणाले की, ‘याप्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय.’ त्यामुळे संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी वानखेडेंनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मार्केटमध्ये हापूस दाखल

swarit

साताऱ्यातील २ खासदारांच्या निराळ्या तऱ्हा!

News Desk

अजित पवार अन् नवनिर्वाचित कृषिमंत्र्यांची एकमेकांवर स्तुतीसुमने

News Desk