HW News Marathi
महाराष्ट्र

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं”,मुनगंटीवारांनी डिवचलं!

मुंबई। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी केली आहे. सत्ताधारी पक्षावर भाजपने जोरदार टीका केली आहे. काल आमदार सुनील राणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर ) टीका केली.मुनगंटीवार म्हणाले, ”गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं.” “आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ”सरकार स्वतःला वाचवण्यासाठी इतरांना दोष देत आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. उद्या मध्यान्न भोजन मी बघितलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्य उत्तम राहावं, उद्या तर हे नेते म्हणतील त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ही अनैसर्गिक युती फार काळ टिकणार नाही !

News Desk

महाराष्ट्रात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोर्ड

swarit

भाजपला धक्का, जळगावात ११ नगरसेवक शिवसेनेत!

News Desk