HW News Marathi
महाराष्ट्र

…मग सभागृहात अंधार कसा ? | अजित पवार

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्यादिवशी विधानभवनातील कामकाज सकाळी १० वाजता सुरू झाले आहे. विरोधक मुख्यमंत्र्याच्या राजीनामा मागण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करत होते. त्याचवेळी सभागृहाची बत्ती गुल झाली होती. सरकारच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वच विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली.

पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचं की नाही यामध्ये सरकारने बराच वेळ घालवला आणि घ्यायचं ठरवल्यानंतर यंत्रणेला काम करायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर हा आजचा खेळखंडोबा झालेला दिसत आहे. ही बाब निषेधार्य आणि चुकीची आहे, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. विशेष करुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातही लाईट नसल्याने त्यांनी मोबाईलच्या बॅटरीवर कागदपत्रांची पाहणी केली. सभागृहात लाईट नसल्याने अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ऊर्जामंत्री सांगत आहेत लाईट आहे…लाईट आहे… मग सभागृहामध्ये लाइट का नाही… सबस्टेशनमध्ये लाइट का नाही. स्वत:विधानसभेच्या अध्यक्षांना येवून पाहणी करावी लागत आहे. ही काम त्या यंत्रणेची आहेत. परंतु त्या यंत्रणेला काम करण्यासाठी जो वेळ दयावा लागतो. तो वेळ दिला गेला नाही. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. मग पावसाळी अधिवेशन नागपूरला का हवे होते.

उपराजधानीत पावसात सभागृहाची इतकी अवस्था होते तर इकडे अधिवेशन घेण्याचा इतका हट्टाहास कशाला पाहिजे होता, असा सवाल करतानाच इथे पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही,जी आहे. तीपण एका तासाने जाईल असे सांगण्यात आले. अशाप्रकारचा गलथान कारभार पावसाळी अधिवेशनात चालला आहे. आजचं हे सरकारचं अपयश आहे .महाराष्ट्रातील जनतेने हे चित्र पहावे. विधानभवन परिसरात पाणी तुंबलेले दिसत आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे असेही अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनसेनेचा दणका! अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले

News Desk

विदर्भ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच, आकडा ११७ वर

News Desk
राजकारण

मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही !

News Desk

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही. मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो. मी पंतप्रधान असताना परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर कायमच पत्रकार परिषद घेत होतो”, असे मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांची प्रचंड चर्चा होताना दिसते. मात्र ते देशात परतल्यानंतर कधीही पत्रकार परिषद घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग बोलत होते. “चेंजिंग इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. “आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे नाते पती-पत्नीसारखे असते. या दोघांमध्येही मतभेद असतात. परंतु तरीही त्यांना एकत्र राहून समाधान शोधणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे केंद्र आणि रिझर्व्ह बँकेमध्ये देखील योग्य ताळमेळ असणे अत्यंत महत्त्वाचे असते”, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. याचमुळे उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. परंतु, उर्जित पटेल यांनी मात्र आपण काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिलेच गव्हर्नर आहेत.

Related posts

राहुल गांधी जम्मू-काश्मीरला रवाना, विमानतळावर रोखण्याची शक्यता

News Desk

प्रकाश शेंडगे वंचित बहुजन आघाडीचे सांगलीतील नवे उमेदवार ?

News Desk

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

Aprna