HW News Marathi
महाराष्ट्र

महाडच्या तळीये दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या आकड्यात वाढ, ३६ लोकांच्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी | महाडच्या तळीये गावात आज(२३ जुलै) दरड कोसळली होती. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तळीये गावात आज (२३ जुलै) पहाटे दरड कोसळून ३५ घरांवर कोसळून ३२ लोकांचा मृत्य झाली होती. मृत व्यक्तींच्या आकड्या मध्ये आता वाढ झाली आहे. मृत व्यक्तींचा एकदा ३२ ते ३६ वर गेला आहे. अजून ८०-८५ लोकं ढिगाऱ्या खाली अडकल्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

सरकार भावनाशून्य झालंय

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.ही घटना मोठी आणि दुर्दैवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त ST कर्मचाऱ्यांचे निलंबन; आता बडतर्फ करण्याचा परबांचा इशारा

News Desk

अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही – ऊर्जामंत्री

News Desk

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna