HW News Marathi
महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

मुंबई । उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरांत पोहोचवलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काल (१४ नोव्हेंबर) अखेरचा श्वास घेतला. शंभराव्या वर्षी त्यांचं निधन झालं तर काल संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी त्याचं निधन झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ३ दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जातो आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं राज्यात आता शोककळा पसरली आहे. पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या नुकत्याच शुभेच्छा दिल्या होत्या. आता प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या मुक्या झाल्या. अखेरपर्यंत म्हणजे कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते.

पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड

“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत म्हणाले, विरोधक हे ब्लॅक फंगस, भाजपचे नेते म्हणतात, तो तर दीड वर्षापूर्वीच महाराष्ट्राला लागलाय!

News Desk

पार्थ पवारांनी आता केले गणेश मंडळांचे कौतुक!

News Desk

लुधियाना न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट; २ जणांचा मृत्यू

Aprna