HW News Marathi
महाराष्ट्र

बारामतीला जाणारे अनियमित पाणी वळविण्याचा निर्णय योग्यच !

मुंबई | “भाजपने नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वात बारामतीला जाणारे अनियमित पाणी वळविण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे विजयी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजे यांचे हे विधान निश्चितच राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली होती. उदयनराजे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

“नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी विलंबच झाला आहे. खरंतर, हा अध्यादेश आघाडीच्या कार्यकाळातच काढायला हवा होता”, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. बारामतीला जाणारे नीरा डाव्या कालव्याचे नियमबाह्य पाणी बंद करण्याच्या गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत आता राज्य सरकारने देखील शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने बारामतीला जाणारे नीरा डाव्या कालव्याचे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे थेट आदेश काढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ही भारतमातेसोबतची गद्दारी’; नितेश राणेंचा राऊतांना टोला

Manasi Devkar

आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर…! – जयंत पाटील

Aprna

वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा गडकरींच्या पत्रामुळे उघड, भाजपचा आरोप!

News Desk