HW News Marathi
महाराष्ट्र

आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका!; अजित पवारांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई | आमची सहनशक्ती संपली, आता आमच्या सहनशक्तीचा कृपा करू कोणी अंत पाहू नये, असा असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. उद्या वेगळी भूमिका घेऊन मेस्मासारखा निर्णय घेतला गेला. तर मागच्या काळातमध्ये असा तुटेपर्यंत तायाचा संपाचे काय अवस्था झाली हे आपण पाहिले. जर कोणी ऐकायलाच तयार नसेल तर नवी भरती सुरू केली. तर नोकरीचा प्रश्न येणार येईल.याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे. इतपर्यंत टोकाची वेळ येवू देऊ नये, अशी माझी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

अजित पवार हे आज (१७ डिसेंबर) जळगावच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे करण्याची विनंती केली. अजित पवार म्हणाले, “आमच्या त्या खात्याचे मंत्री अनिल परब सातत्याने त्यांच्याशी चर्चा करून संयम दाखविला आहे. आता त्यांचीही सहनशीलता संपत असल्यामुळे तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. या आधी अनेकदा मुभा आमच्या अनिल परबांनी दिला. आता मात्र, आमची सहनशीलता संपली आता आमच्या सहनशीलतेचा कृपा करू कोणी अनंत पाहू नये. माझी कळकळेची विनंती आहे.”

अहवाला आल्यानतंर विलीनीकरणाचा निर्णय घेणार

“एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या अहवालानतंर निर्णय घेण्यात येणार आहे,” असे देखील अजित पवार म्हणाले. विलीनीकरणाच्या मागणीसाठी समिती नेमण्यात आली आहे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या समितीचा अहवाल आल्याशिवाय निर्णय घेण्यात येणार नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे इतर राज्यात कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी होता. पण आता कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यात आला आहे. राज्यात आता शाळा, महाविद्यालय देखील सुरु झाली आहे.

एसटी कर्मचारी हट्टाला पेटले

“एसटी कर्मचारी हट्टाला पेटले हे बरोबर नाही, कर्मचारी आणि प्रवासी आपलेच आहेत. यात अतिशय समजूदारपणे भूमिका घेतली पाहिजे. मी याआधीही तुम्हाला सांगितले की, प्रश्न मांडणाऱ्यांनी देखील थोडे पुढे मागे सरकरले पाहिजे. आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनी देखील थोडे पुढे मागे सरकरले पाहिजे. ही भूमिका महाविकासआघाडीच्या सरकारने स्वीकारली.” “एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आता इतर राज्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढविला आहे. आणि पगार १० तारखेच्या आधी देण्याची हमी देखील दिली आहे. आता कर्मचाऱ्यांनी समांज्याची भूमिका घ्यावी,” असे अजित पवारांनी म्हटले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? – फडणवीस

News Desk

एकाच क्रीडा संकुलाचे दोन वेळेस उद्घाटन, होय ! उल्हासनगर में कुछ भी होता है,

swarit

‘प्रवीण दरेकरांविरोधात पुण्यात जोडे मारो आंदोलन’

News Desk