HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

मुंबई।गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावती शहरात झालेला प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पायाला याच पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येते. तो संयोग नव्हे तर प्रयोग होता’, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.‘बंदूक हाती असणार्‍यांचा मुकाबला करणे सोपे आहे. पण, जे येणार्‍या पिढ्यांना विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण आहे आणि त्यामुळेच अर्बन नक्षलवादाचे षडयंत्र समजून घ्यावे लागेल. असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी अर्बन नक्षलवादावर ही टीका केली आहे.

मुठभर विचारवंत अराजक निर्माण करतात

महाराष्ट्रात 50-50 हजाराचे मोर्चे निघाले. वाटेत हिंदूंची दुकानं तोडली, जाळली. दुसऱ्या दिवशी ज्यांची दुकानं जाळली ते रस्त्यावर आले की पोलिसांनी कारवाई करायची. पण आदल्या दिवशीची घटना जिलीट करुन टाकायची असा प्रयोग सुरु आहे. मोदी सरकार हटवता येत नाही त्यावेळी अशा पद्धतीने मुठभर विचारवंत अराजक निर्माण करतात. असे प्रयोग संपवावेच लागतील. हे उदारमतवादी नव्हे तर उधारमतवादी आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नक्षलवाद कमी होऊन फक्त वसुलीपुरता उरला

डावी विषवल्ली डोक्यात विष पेरुन आपलं वाईट आणि इतर विचार चांगले हे भाव तयार करत आहेत. अशा परिस्थितीत सच्चिदानंद शेवडे राष्ट्रवादी विचार मांडतात. मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून डावी विषवल्ली आपल्याला कशी पोखरते हे पाहण्याची दुर्दैवी संधी मला मिळाली आहे. आदिवासींच्या माध्यमातून नक्षलवादी विचार मांडण्याचा विचार व्हायचा. पोलिसांनी त्यांचा नायनाट सुरु केला. त्यावेळी नक्षलवाद कमी होऊन फक्त वसुलीपुरता उरला. त्यावेळी डाव्यांच्या लक्षात आलं की आदिवासींना आता फार काळ वापरता येणार नाही. त्यावेळी अर्बन नक्षलवाद उदयाला आला आहे, असं फडणवीस म्हणाले.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. ‘डाव्यांची विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. ज्येष्ठ विचारवंत सु. ग. शेवडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, रवींद्र चव्हाण आणि इतरही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अमरावतीत मोठा हिंसाचार झाला. त्रिपुरात ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारण आणि टीका करण्याची वेळ नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

News Desk

तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकिर्दी एवढंही नाही, हर्षवर्धन पाटलांची लेक तांबेंवर गरजली 

News Desk

शरद पवारांचा ‘हा’विश्वासू नेता लवकरचं शिवसेनेत..

Gauri Tilekar