HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला घाई नाही, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल !

मुंबई । माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता शिवसेना खासदार संजय राऊतांसोबतच्या त्यांच्या भेटीनंतर आज (२७ सप्टेंबर) पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला सरकार बनवण्याची कोणतीही घाई नाही. राज्यातील हे सरकार आपल्या कर्मानेच पडेल. माझ्या आणि संजय राऊतांच्या भेटीचे चुकीचे अर्थ काढले गेले. आमच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही”, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

“संजय राऊत यांना ‘सामना’साठी माझी मुलाखत घ्यायची आहे. मात्र, त्या मुलाखतीसाठी माझ्या काही अटी आहेत. म्हणजे त्या मुलाखतीदरम्यान माझाही कॅमेरा तिथे असेल अशा काही अटी आहेत. याविषयी माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली”, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांची शनिवारी (२६ सप्टेंबर) मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या भेटीनंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. महाराष्ट्र्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र, फडणवीसांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी सांगली दौरा पुढे ढकलला

News Desk

हवाई दलाचे विमान कोसळले

News Desk

बेटी बचाओ, बेटी पढाओ, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या उलट कारभार उत्तरप्रदेशात सुरु

News Desk