HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्रात लोकशाही नाही तर लॉकशाही”

पंढरपूर | महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होताना दिसत आहे. अशात सरकारने कोणत्याही सभा आयोजित करु नका असं सांगूनही नेत्यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सभांचा सपाटा लावलाच आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज (१२ एप्रिल) पंढरपूरात सभा घेत आहेत. महत्वाचे म्हणजे अजित पवार यांनी जिथून सभा घेतली होती तिथूनच फडणवीसांनी आजच्या सभांचा श्रीगणेशा केला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे, असं सांगतानाच देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे.

सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन केला जात आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

वीजबिलाच्या मुद्यावरुनही फडणवीसांनी सरकारला सुनावलं

या सरकारने वीज कापणार नाही असं आश्वासन अधिवेशनाच्या सुरुवातीला दिलं. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या सरकारने लगेचच वीज तोडणी सुरू केली. एखाद्या गावात ५ लोकांनी वीज बिल भरलं नाही तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटलं जात आहे. त्यामुळे आज पंढरपूरच्या विकासाचं आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

२ मेला देशामध्ये सगळ्यांनाच धक्का बसणार – देवेंद्र फडणवीस

भगवान बसवेश्वरांच्या स्मारकासाठी या सरकारने अर्थ संकल्पात काहीही तरतूद केली नाही. आम्ही या स्मारकासाठी तरतूद केली होती. त्यांना विचारल्यावर फक्त एकही पैसा कमी पडू देणार नाही, असं हे सरकार सांगत असतं, असं सांगतानाच येत्या २ मेला पंढरपूरचा निकाल लागेल. त्याच दिवशी बंगाल आणि आसामचाही निकाल लागणार आहे. त्यावेळी देशामध्ये सर्वांनाच धक्का बसेल, असा दावाही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC संदर्भात राज्य सरकारने दुर्लक्ष करु नये ! फडणवीसांची टीका

Ruchita Chowdhary

“भाजपने आपले बिअर व वाईनरीचे कारखाने बंद करून पॅकबंद पाणी विकावे”

News Desk

महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करण्याचे नागरिकांना महापौरांकडून आवाहन

News Desk