HW News Marathi
महाराष्ट्र

“जयंत पाटलांनी पावसात भाषण करण्यापेक्षा गावांचा पाण्याचा प्रश्न आधी मिटवावा”

पंढरपूर | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढला असला तरी निवडणूकींचा धुरळा जोरदार उडत आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली असून भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ आवडाडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेत धमुाकूळच घातला. त्यातही काल (११ एप्रिल) जयंत पाटील यांनी भर पावसात घेतलेली सभा तर जास्तच गाजली. त्यांच्या याच सभेवरुन भाजप नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गल्लोगल्ली फिरत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, अशा कणखर शब्दांत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते तेव्हा त्यांनी ही टीका केली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप विकासाच्या मुद्द्यांवरुन लढत आहे. अजित पावर यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत आहे. अजित पवार हे गल्लोगल्ली फिरत आहेत, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा, अशी मागणी खोत यांनी केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली, असंही खोत म्हणाले.

निवडणुकीच्या आधी अजित पवार सातबारा कोरा करणार, असे सांगत होते. नाही केले तर पवार आडनाव लावणार नाही, असेही म्हणाल्याची आठवण सदाभाऊ खोत यांनी करुन दिली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपले असल्याचा घणाघातही केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक चुरशीची ठरणार असं एकूणच चित्र दिसत आहे. आज (१२ एप्रिल) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ही पंढरपूरात गेले असून आज ते ६ सभा घेणार आहेत. त्यामुळे भाजप बाजी मारणार की जयंत पाटील पुन्हा भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, औरंगाबाद मुद्द्यावरुन सेना आक्रमक

News Desk

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, कोणत्याही क्षणी होणार अटक

swarit