HW News Marathi
महाराष्ट्र

‘सामनात आमच्याबद्दल कधी चांगलं लिहिलं गेलं?’, फडणवीसांचा सवाल

पुणे | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात शिवसेना खासदार संजय राऊत कायम राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर टीका करत असतात. यावरुनच आज (९ जुलै) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. सामनामध्ये आमच्याबद्दल चांगलं कधी काही लिहिलं गेलं आहे का? चांगलं लिहायला ते काय आमचे हितचिंतक आहेत का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच संजय राऊत बोलतात म्हणजे त्यांना सगळं कळतं असं नाही, ते काही सर्वज्ञ नाहीत असाही टोला फडणवीस यांनी लगावला. भागवत कराडांना मंत्रिपद दिलं त्याबद्दल पंकजा ताईंना आनंदच झाला असणार. पुण्यात आयोजित करण्यात एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही सरकारला उघडं पाडलं

देशात सर्वात मोठा बसेसचा ताफा उपलब्ध करून देणारी पुणे महापालिका झाली आहे त्याचा आम्हाला आनंद आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्तारूढ पक्षाच्या वतीने एकतर्फी कारभार चालवला गेला. कपोलकल्पित आरोप लावून आमच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही सरकारला उघडं पाडलं म्हणून त्यांनी आमचे आमदार निलंबित केले असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं

विचारवंत हरी नरके यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता, ते विचारवंत आहे त्यांच्या ओबीसींचं प्रवक्तेपद घेतलं पाहिजे मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. ओबीसींची इम्पेरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारला देणे शक्य होतं पण त्यांनी तो दिला नाही वेळकाढूपणा केला त्यामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द झालं.

नाना पटोलेंनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता काँग्रेसच्या राज्यातल्या आणि दिल्लीतल्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे असा टोला त्यांनी लगावला. एखाद्या मंत्र्याने त्याच्या बायकोला मारलं तरी केंद्राने मारलं असं राज्यातले नेते सांगतात. 108 रूपये प्रति लिटरमधले 42 रूपये हे राज्य सरकारला जातात ते त्यांनी कमी करावेत म्हणजे पेट्रोलचे दर कमी होतील. गुजरातमध्ये पेट्रोलचा दर 90 रूपये प्रति लिटर आहे असंही त्यांनी ऐकवलं. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यानंतर मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की मुंबईतली लोकल सेवा सुरू झाली पाहिजे असं मला मनापासून वाटतं पण तुम्ही प्रश्न चुकीच्या माणसाला विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk

बावनकुळेंवर अन्याय झाला तेव्हा इतका गलबललो नव्हतो, अमोल मिटकरींचे सुचक ट्विट

News Desk

पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार – अनिल देशमुख 

News Desk