HW News Marathi
महाराष्ट्र

“आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा”, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अद्याप शिथिल केलेले नाहीत, त्यावरून विरोधी पक्ष त्यांच्यावर निशाणा साधत आहे. “मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(५ सप्टेंबर) मनसे आणि भाजप पक्षाला टोला लगावला होता. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले होते. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.आघाडी सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडतात. प्रत्येकजण सुभेदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशाप्रकारची अवस्था या आघाडीची पहायला मिळतेय, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना विरोधकांना टोला लगावला आहे, ते म्हणाले, “काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली आहे. पण त्या गोष्टी दीर्घकाळ बंद ठेवायला लागू नये म्हणूनच तर आम्ही ते हळूहळू, परिस्थितीचा आढावा घेऊन उघडत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.आम्ही राजकारण्यांनीही करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आम्ही बाहेर जातो, जनतेत जातो, त्यावेळी आम्हीच जर नियमांचं पालन केलं नाही तर जनतेला काय सांगणार?, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल

राज ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारची कान उघडणी केली आहे. “ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळ्यात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

News Desk

औरंगाबादेत भव्य मराठा क्रांती रॅली

News Desk

कोरोनाकाळात महाराष्ट्रासोबत लसच नाही तर इतर वैद्यकीय उपकरण वाटपातही दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

News Desk