HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे धनगर समाजाचा उद्रेक

पुणे | धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे वेळोवेळी सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे आता या समाजाचा उद्रेक झाला आहे. आदिवासी विकास आणि संशोधन संस्थेच्या आस्थापन कार्यालयाची धनगर समाजाकडून तोडफोड करण्यात आली आहे. धनगर आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारकडून मात्र याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची भावना या समाजाच्या आंदोलनकर्त्यांच्या मनात आहे.

 

औरंगाबाद येथे धनगर समाजाकडून ३१ आॅगस्ट रोजी एल्गार पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनात धनगर समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले गेले आहे. त्याचप्रमाणे सरकारने जर लवकरात लवकर आरक्षणाबाबतीत निर्णय घेतला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही धनगर समाजाकडून दिला गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्राचं वाटोळं आता…”, अंजली दमानियांची खोचक प्रतिक्रिया!

News Desk

आघाडीच्या नावात ज्याचं ‘शिव’हरवलं त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का याची चर्चा करणं हास्यास्पद!

News Desk

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

News Desk