HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

परभणी | गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. दरम्यान आरक्षणासाठी काही युवकांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली. आता मराठा समाजापाठोपाठ आत्महत्येचे लोण धनगर समाजातही पसरण्याचे शक्यता दिसून येत आहे. जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केली. सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील १९ वर्षीय योगेश राधाकिशन कारके या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास योगेश या धनगर समाजाच्या युवकाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगेशने आपल्या मोबाईल फोनवरुन बी. शिंदे या व्यक्तीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. परंतू रेंज नसल्यामुळे हा मेसेज मोबाईलमधून गेलेला नसल्याचे काही खात्रीलायक सुत्रांकडून माहीत मिळत आहे. याआधी देखील औरंगाबादच्या पैठणमध्ये धनगर समाजाच्या युवकाने आत्महत्या केली होती.

त्यामुळे मराठा समाजापाठोपाठ आता राज्यात आरक्षणासाठी धनगर समाजातील तरुण देखील आत्महत्येचे पाउल उचलताना पहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन धनगर युवकाची ही दुसरी आत्महत्या आहे. सदर तरुणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखाची मदत आणि घरातील एकाला शासकीय सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk

युध्दपातळीवर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश

News Desk

“….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”, चंद्रकांत पाटलांचा शब्द

News Desk
कृषी

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

News Desk

वर्धा । देवळी येथील शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन आणि तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे. सदर बाब काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक अस्मिता मेसरे तसेच प्रियंका आडे यांना सांगितली असता त्यांनी परिसरातील पिकांची पाहणी करून अहवाल तयार करीत तो वरिष्ठांना सादर केला आहे.

तालुक्यातील मौजा नागझरी व बेलगाव येथे हुमनी नावाच्या अळीचा सोयाबीन व तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी संपूर्ण झाड उलथावून लावत आहे. आधीच कमी पावसामुळे सोयाबीन पीक संकटात आहे. त्यातच हे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देत सोयाबीन व तूर उत्पादक शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती कृषी अधिकारी यांना दुरध्वनीवरुन दिली.

या अळीचे भुंगे जमिनीवर येवून अंडी घालतात. याप्रकारे अंडीतून निघालेल्या अळीचा कुजलेल्या शेणखताचे माध्यमातून शेतापर्यंत प्रवास असतो. या अळीचा वेळीच नायनाट न केल्यास संपूर्ण पीक धोक्यात येण्याची भीती असते. अळीचा प्रादुर्भाव असलेल्या या भागात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी व तालुका कृषी कार्यालयाचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. हुमनी अळीचा प्रकोप असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतांचे पंचनामे व उपाय-योजना केली जात आहे.

Related posts

वऱ्हाडात यंदा करावी लागणार तिबार पेरणी

News Desk

गव्हावरील आयात शुल्क दुपटीने वाढणार

News Desk

‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी

News Desk