HW News Marathi
महाराष्ट्र

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

मुंबई। कापूस-सोयाबीन प्रश्नावर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होत. त्यांना नागपूर पोलिसांनी अटक देखील केली आहे. आणि अशातच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची मोठी घोषणा केली आणि यावरच आता रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो

आज मी ऐकलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. हे ऐकून आनंद वाटला बरं वाटलं,एक वर्ष झाले दिल्लीच्या सीमा भागामध्ये शेतकरी तळ ठोकून आंदोलन करताय. देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी घटना आहे.एवढे मोठे आंदोलन या देशांमध्ये पहिल्यांदा झाल असेल स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच. त्यामुळे हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या एकी पुढं मी मी म्हणणार्‍या केंद्र सरकारला झुकाव लागले.या केंद्र सरकारची मस्ती आणि माज उतरवण्याचे काम शेतकऱ्यांनी केलं. दिल्लीच्या सीमा भागात आंदोलन करणाऱ्या सगळ्याच शेतकऱ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला सलाम करतो. मी तुमच्या या चिकाटीमुळे आणि आंदोलनाच्या रेट्यामुळे स्वतः पंतप्रधानांना हे कायदे रद्द करावे लागले.

या संदर्भातला आदेश आणि कायदा काढवा

या देशांमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की सरकारपेक्षा शेतकऱ्यांची ताकद मोठी असते हे शेतकऱ्यांनी आणि बळीराजाने दाखवून दिले. म्हणून मी शेतकऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो पण नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली. घोषणा आणि प्रत्यक्ष आदेश आणि कायदा करणे यात फरक आहे. त्यामुळे या संदर्भातला आदेश आणि कायदा काढवा अशी माझी विनंती आहे.अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.ते सोयाबीन प्रति क्विंटल भाव 8 हजार रुपये व कापसाचा प्रतिक्विंटल भाव 12 हजार रुपये स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धोरण आखावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले?

याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले या निर्णयाचे स्वागत

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय, असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी नमूद केलं आहे. येत्या २५ तारखेला दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे, आणि वर्षभर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे सत्याग्रहाचा विजय झाला अस देखील शेट्टी म्हणाले.

आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो

तिन्ही कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असून याच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर , मोदींची घोषणा महत्वाची मानली जात असून याचा राजकीय क्षेत्रावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडल्याची कबुलीही दिली. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. एक वर्ग विरोध करत होता. ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यांना या कायद्याचं महत्त्वं सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आणि तर्कही जाणून घेतली. त्यात कसूर ठेवली नाही, असं असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुख्यात गुंड गजानन मारणेला सातारा जिल्हयात अटक…

News Desk

पूरग्रस्त गावे ४-५ दिवसांत चकाचक होतील !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जाणार

News Desk