HW News Marathi
महाराष्ट्र

“…मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका”, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वादावर अखेर शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारने पडदा टाकला. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयापाठोपाठ राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे देखील उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली होणार असून त्यासाठी नियमावली देखील राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यावरून आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून टीका करण्यता येत आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत “फार मोठं काही केल्याचा टेंभा मिरवू नका”, असं म्हटलं आहे.

मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका

आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून हे ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. “मंदिरं आणि रंगमंदिरं उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका. गेल्या दीड वर्षात लोककलावंत. रंगकर्मी, बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर उपासमारीची वेळ आणलीत. मंदिराजवळ अगरबत्ती, धूप-कापूर, प्रसाद विकणाऱ्यांचे हालहाल केलेत त्याचं काय?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

रवळनाथासमोर हात जोडून माफी मागा

दरम्यान, “रंगमंदिरं आणि प्रार्थनास्थळं यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचा आणि भाजपाचा रेटा वाढला, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. देवाची आणि भक्तांची, नाटक-सिनेमा प्रेमी आणि रंगदेवतेची ताटातूट केलीत. कोकणात चिपीला जाताय, तर रवळनाथासमोर हात जोडून माफी मागा. रंगदेवतेची सेवा करणाऱ्यांना नुकसान भरपाई द्या. ती मिळायलाच हवी”, अशी मागणी देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती, आशिष शेलारांचा आरोप

News Desk

शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान; कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ! – मुख्यमंत्री 

Aprna

प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna